
############################################################################
हैदराबाद येथून लांजी जिल्हा बालाघाट मध्यप्रदेश ला जात असतानाच चंद्रपूर-गडचिरोली महामार्गावरील किसान नगर जवळ ट्रॅव्हलस चा अपघात झाला त्यात 15 च्या जवळपास जखमी झाल्याची माहिती प्राप्त होत असून या ट्रॅव्हल मध्ये 50 हुन अधिक प्रवाशी प्रवास करीत होते अशी माहिती मिळते आहे.ट्रॅव्हलस भरधाव वेगाने जात असताना वाहन चालकाचे गाडी वरून नियंत्रण सुटले आणि गाडी रस्त्याच्या कडेला पलटी मारली.अपघात होताच घटनास्थळी असणारे अनेक जण त्यांना बाहेर काढले व त्यांना सावली ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले.
