
सावली तालुक्यातील रेती घाट बंद असल्यामुळे ग्रामीन भागात पंतप्रधान आवास योजनेतील घरकुल धारकाना मोठा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शासनाने ग्रामीन भागातील गरीब जनतेला पंतप्रधान आवास योजनाचे अनेक दिवसापासुन बाधकाम सुरु आहेत.तर काही लाभार्थ्यांच्या घराचे अजून कामाला सुरूवात पण झालेली नाही.अशातच रेती उपल्बध होत नसल्यामुळे अनेक घरकुल धारकाना रेती अभावी घर बाधकाम अर्धावस्थेत दिसुन येत आहे.
रेती अभावी घरकुल बाधकामात अळथळा निर्मान झाल्याने अनेक घरकुल धारकाना मोठा त्रास होत आहे.सिमेंट,लोहा, विटा, गिट्टी यांचा भाव ही वाढून आहे त्यामूळे सामान्यांना योजनेच्या पैशातून घर बांधणे कठीण होऊन गेले आहे.घर बांधायचे असेल तर इकडून-तिकडून पैशाची जुळवा जुळव करावी लागते. अशातच रेती मिळणे ही अशक्य झाले असुन आणि समोर पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे घरकुल धारकांना रेती मीळत नसल्यामुळे अनेक अडचणीचा सामना करावा लागत असुन अनेक घरकुल धारकाना पाऊसाअभावी नाहक त्रास सहन लागणार असल्याने त्यांची घराचे अर्धे बांधकाम करून तर काहींना घर बांधकामाला सुरुवात करता येणार नाही.नदीला पूर आल्यानंतर त्यांना रेती मिळणेही कठीण होऊन जाणार अशातच लाभार्थ्यांना योजनेपासून मुकावे लागणार,म्हणून नदीला पुर येण्याअगोदर लाभार्थ्यांना तहसील कार्यालय मार्फत झिरो रॉयल्टी पास देऊन घरकुल धारकाना पाच ब्रास रेती उपल्बध करुन द्यावे अशी मागणी ग्रा प सदस्य राकेश गोलेपल्लीवार यांनी केली आहे.
